“परंतु आपल्याकडेच येणार वाडा.”

“अहो त्या वाड्यांत असते धन तर रामराव कशाला जाते? त्यांनी नसते का खणून पाहिले? उगीच फसाल झाले.”

“पण हे गेले कुठे?”

“जीवबीव तर नाही ना देणार?”

“अहो तिघे का जीव देतील?”

“अहो त्या मद्रासकडे का कोठे एका कुटुंबातील सात जणे मेली. मुलांनाहि त्यांनी जगांत ठेवलं नाही. काय वाईट स्थिति!”

जगन्नाथ एकदम खाली आला. तो भावनांनी कापत होता.

“खरेच का गुणा गेला? त्याचे आईबाप गेले?”

“त्यांच्या घराला कुलूप आहे खरे. मग कोठे गेले असतील देव जाणे.”

“फिरायला नसतील तिघे गेली?”

“आजपर्यंत कधी फिरायला गेली नाहीत.”

“पद्मालयाला तर नसतील गेली?”

“अहो आम्हांला तरी काय माहीत?”

“दादा, माझ्या मित्राला तू दवडलेस. तू फसवलेस मला. आईच्या पायाची शपथ घेतली होतील.”

“मी कोठे घेतली होती शपथ?”

“आणि देवासमक्ष खरे सांगेन असे कोर्टकचेरीत नेहमी म्हणावेच लागते. ती रूढी आहे. विद्येशपथ, आईशपथ, असे म्हणतात.”

“म्हणजे ते म्हणणे का खोटे?”

“तुला व्यवहार कळायला सात जन्म लागतील.”

“आग लाव त्या व्यवहाराला.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel