काळभैरव , भैरोबा...... म्हणजेच शिवाचा अवतार , विलयाची देवता , मोक्षदायी पुण्यक्षेत्र काशी चा रक्षक . अघोर पंथाची मुख्य देवता . आदिमाया जगत्जननी सतीच्या ५२ शक्तीपीठांची रक्षक देवता . तामस शक्तीवर याच आधिपत्य असत . वेताळ , धूम्राक्ष , कुष्मांड सारखे अनेक पिशाच्चान्वर याच नियंत्रण असत . तामसी साधक सर्व प्रथम भैरावला प्रसन्न करून घेतात ज्यामुळे त्यांना पुढच्या साधने पिशाच्चांकडून अडथळा येऊ नये . हनुमान , दत्ता सारखा आजही लोक भूत बाधा झाल्यावर भैरवाचा धावा करतात . त्याच काळभैरवाच एक मंदिर आहे गड-हिंगलाज जवळ . महाराष्ट्र - कर्नाटक च्या सीमेवर .गड-हिंगलाज पासून बहिरेवाडी गावला निघालो की ४ किमी आपल्या या पुराण कथेतल्या कालभैरवाच एक मंदीर लागत . हे पांडवकालीन मंदिर शेंदरी नावाच्या डोंगरावर वसल आहे . याला कालभैरावाचा डोंगर असेही म्हणतात .साधारण ३०० पायऱ्या चढून आपण मंदिरात पोहोचतो . अस म्हणतात की काळ भैरव ह्या गावची आणि त्या पंचक्रोशीची रक्षक देवता आहे . ती भूत -प्रेतांचा नाश करते . ह्या डोंगरावर राहून ती चारी बाजूला लक्ष ठेऊन असते .हिला केलेला नवस हमखास पूर्ण होतो . लोक हा नवस फेडायला गड - हिंग्लज पासून दंडवत घालत येतात . दर रविवारी ह्या देवळात खूप गर्दी असते . दर अमावास्येला अनेक भाविक भक्ती भावाने देवाला नारळ अर्पण करतात . पण काही गोष्टी अश्या असतात कि ज्याच गूढ कधीच उकळत नाही . विज्ञानाने कितीही झपाटा मारून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तरी नाही . अशीच एक गोष्ट या मंदिरा बाबत ..... दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ह्या काळ भैरवाच्या देवळात मोठी यात्रा भरते .पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पुरणपोळीचे जेवण जेवून गावकरी देवळापाशी जमतात . चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी महाराष्ट्र - कर्नाटक मधून आलेल्या हजारो भाविकांकडून अक्षरशः हजारो बकर्यांची कत्तल केली जाते . ह्या बकऱ्याचा नैवैद्य भैरोबाला दाखवला जात नाही . देवळाच्या बाहेर असलेल्या एका विशिष्ठ जागी कापलेल्या हजारो बकर्यांची डोकी रचून ठेवली जातात . त्या रात्री देवळाच्या गुरवासकट सर्व मंडळी देवळात न थांबता पायऱ्या उतरून खाली मुक्काम करतात . त्यावेळी मंदिराच्या आसपास कोणीसुध्धा थाबत नाही. ह्या देवळाच्या आसपास घनदाट जंगल नाही . सकाळी जेव्हा पुन्हा सर्वजण देवळापाशी पोहोचतात त्यावेळेस अक्षरशः थप्पी लाऊन ठेवलेल्या बकऱ्याच्या मुन्डक्यांतील एक कण देखील शिल्लक नसतो . रक्ताचा एक थेंब देखील जमिनीवर पडत नाही . कुठलेही जंगली श्वापद एवढे अन्न एका रात्रीत खाऊ शकणार नाही . एवढी हजारो मुंडकी एका रात्रीतच फस्त होतात . ती कोण खात , कुठे गायब होतात हे आज पर्यंत कोणालाच कळाल नाही . एकदा ३ मित्रांनी या गोष्टीचाल उलगडा करायचं ठरव ... त्या चैत्र पौर्णिमेच्या रात्री हट्टाने मंदिराजवळ थाबले होते . त्या रात्रीच ते ३ घे गायब झाले . नंतर कधी दिसलेच नाही . ते पळून जाण्याची ही शक्यता नव्हती कारण तशी काही सोयच नाही . ह्या घटने नंतर परत कोणी त्याचा उलट छडा लवाचा प्रयत्न केला नाही. अस म्हणतात की तो बोकडाचा बळी वातावरणतल्या अतृप्त पिशाच्च शक्तींना दिला जातो . तो बोकडाच्या डोक्यान चा नैवैद्य त्या पिशाच्चन साठी ठेवला जातो . त्या सगळ्या पिशाच्चांना त्या रात्री हा बळी घ्यायची परवानगी असते . तो बळी मिळाला कि वातावरणातील अतृप्त पिशाच्च शक्ती शांत होतात . असे प्रकार फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी आढळतात . कोकणात पण असाच एक विधी अनेक गावात एका ठरावीक दिवशी केला जातो . हा विधी ' चालगती ' या नावाने ओळखला जातो .
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
गावांतल्या गजाली
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
सापळा
वाड्याचे रहस्य
अजरामर कथा
श्यामची आई
 भवानी तलवारीचे रहस्य
झोंबडी पूल
खुनाची वेळ
जगातील अद्भूत रहस्ये
भूते पकडणारा  तात्या नाव्ही