स्मशानात पूर्वी
मुडदा एखादा यायचा,
रडता रडता सारा
गाव गोळा व्हायचा...

हल्ली स्मशानातही
मुडदे रोज येऊ लागले
येण्याआधी कित्येक
बेवारस होऊ लागले

जाती पातीचा आता
भेदभाव नव्हता,
सजलेल्या तिरडीला
मानकरीही नव्हता....

खरंच मरणाचे हाल
कवडीमोल  झाले
गर्दीत मुडदे बेवारस
होऊ झाले...

संजय सावळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel