एका पिंजर्‍यात एक पारवा कोंडून ठेवला होता. तो 'या पिंजर्‍यात मला किती पिलं झाली ! मी किती धन्य !' अशी बढाई मारू लागला. तेव्हा जवळच असलेला कावळा त्या पिंजर्‍याजवळ येऊन म्हणाला, 'मित्रा, तुझ्या बढाईच्या गोष्टी पुरे कर. जो जो तुझी संतति वाढेल, तो तो ती तुला अधिक दुःख होण्यास कारण होईल. कारण ती सर्व पिलं ह्याच पिंजर्‍यात तुझ्यासारखी कोंडून ठेवलेली तुला पाहावी लागतील.

तात्पर्य

- पारतंत्र्यात राहून संततीचा सुकाळ होण्यापेक्षा स्वातंत्र्यात राहून निर्वंश होणे बरे !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel