एकदा एका रानडुकराला एक गाढवाचे पोर रानात भेटले. तेव्हा ते गाढव चेष्टेने रानडुकराला म्हणाले, 'रामराम हो भाऊ रामराम !'

गाढवाचे ते सलगीचे बोलणे ऐकून डुकर खूप चिडले. परंतु आपला राग आवरून ते म्हणाले,

'हे हलक्या प्राण्या तू आपल्या वाटेने जा. तुला ठार मारण्यासाठी मला एक क्षणही वेळ लागणार नाही. परंतु गाढवाच्या रक्ताने माझे तोंड विटाळण्यास मी तयार नाही.'

तात्पर्य

- मूर्ख लोक स्वतःस फार शहाणे समजून मोठ्यांची चेष्टा करायला जातात परंतु मोठे लोक मात्र त्यांना सोडून देतात हे यांचे सुदैवच म्हटले पाहिजे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel