गोविंदा :- काम करु लागले म्हणजे आपोआप सारे समजू लागते. चर्चा ह्या पुष्कळ वेळा निरुपयोगी असतात.

राम :- मग ठरले ना श्याम ? आज रात्रीपासून सुरु होऊ दे रामायण.

श्याम
:- होऊ देत सुरु भाकडकथा.

नामदेव
:- श्याम ! तू आमची अशी टिंगल रे का करतोस ? आमच्या भावना का दुखावतोस ? असतील तुझ्या भाकडकथा व रडकथा. आम्हांला त्या गोड आहेत, पवित्र आहेत.

श्याम
:- बरे, मी असे पुन: बोलणार नाही. परंतु कोणत्याही गोष्टीस अवास्तव महत्त्व देऊ नये. माझ्याजवळ बोलता हे ठीक. परंतु बाहेर जगात असे म्हणाल तर फजीत व्हाल, समजले ना ?

राम
:- चला रे आता जाऊ; श्यामला आता विश्रांती घेऊ दे. त्याला दिवसा त्रास नका देत जाऊ; रात्री त्याला बोलावे लागेल आणि एखाद्या वेळेस सांगता सांगता जर भावना फारच उचंबळल्या तर त्याला मागून पुष्कळच गळल्यासारखे होईल. श्यामला जपून लुटा. गाईला वाचवून तिचे दूध प्या.

नामदेव
:- गाडी धीरे धीरे हाक  ।  बाबा धीरे धीरे हाक.

श्यामकडे प्रेमाने भरलेल्या डोळयांनी पहात ते सारे मित्र कामाला निघून गेले. श्यामही क्षणभर डोळे मिटून पडला व नंतर 'गाडी धीरे धीरे हाक' हेच गाणे गुणगुणत त्या आराम-खुर्चीतच झोपी गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel