एकदा एका उकीरड्यात दोन कोंबड्यांचे युद्ध जुंपले. एका कोंबड्याने दुसर्‍या कोंबड्याला खूप जखमी केले. त्या कोंबड्याला आपल्या कर्तबगारीबद्दल इतका गर्व वाटला की, एका खोपटावर बसून 'मी लढाई जिंकली', 'मी लढाई जिंकली' असे तो मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याचवेळी आकाशातून एक गरुड चालला होता. त्याने पाहिले, आणि मारून खाण्यासाठी झडप घालून पकडले. हा सर्व प्रकार तो दुसरा कोंबडा पहात होता. तो अगदी ऐटीत बाहेर पडला व मजेने फिरू लागला.

तात्पर्य

- एवढ्यातेवढ्या यशाने कधी फुगून जाऊ नये, कारण कोणाचे नशीब केव्हा फिरेल काही सांगता येत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel