एकदा काही कोळी नदीत जाळे टाकून मासे धरीत होते. त्यांनी पुष्कळ वेळा प्रयत्‍न केला पण चांगलेसे मासे त्यांना मिळाले नाहीत. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा जाळे टाकले व ते वर उचलतांना इतके जड लागले की, त्यात भलामोठा मासा असावा असे त्यांना वाटले. पण जाळे वर ओढून पहातात तो त्यात एक मोठा दगड व अगदी थोडे बारीक मासे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांना फार वाईट वाटले; तेव्हा एक कोळी म्हणाला, 'मित्रांनो, सुख आणि दूःख ही जुळी भावंड आहेत. त्यापैकी एक आलं की त्याच्यामागून दुसरं आलंच म्हणून समजावं.'

तात्पर्य

- सुखदुःखं मनुष्यमात्राच्या मागं लागलीच आहेत. त्यापैकी एक आले की त्याच्यामागून दुसरे आलेच म्हणून समजावे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel