एकदा एका सिंहाला, एखादा लठ्ठ बैल खाण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने एका बैलाला सन्मानाने आपल्या घरी मेजवानीस येण्याची विनंती केली. बैलाने ती मान्य केली व तो सिंहाच्या घरी गेला. तेव्हा त्याला, मोठीमोठी भांडी व स्वैपाकाची इतर तयारी दिसली. ते पाहून तो बैल पळत सुटला, तेव्हा सिंह म्हणाला,

'मित्रा असा पळून का चाललास?'

बैल म्हणाला, 'ही सगळी तयारी पाहून मला कळून चुकलं आहे की, मेजवानीत बैलाचंच मांस असणार, तेव्हा त्या पक्वान्नात माझं रूपांतर होण्यापूर्वीच मी निघून जातो.

तात्पर्य

- कोणाच्या गोड बोलण्याला भुलून आपण त्याच्या जाळ्यात सापडलो तरी त्याचा दुष्ट हेतू लक्षात येताच आपण सावध होऊन निसटावे, यातच शहाणपण आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel