एका वडाच्या झाडाखाली काही उंदीर रहात असत. एकदा त्यांना असे वाटले की, ज्या ज्या वेळी आपल्याला भूक लागते त्या त्या वेळी वडाची फळे खाण्यासाठी आपल्याला वडाच्या झाडावर चढावे लागते. त्यापेक्षा ते झाडच खाली पाडले तर बरे होईल. असा विचार करून काही उंदीर त्या झाडाची मुळे कुरतडण्यास निघाले. तेव्हा काही शहाणे उंदीर त्यांना म्हणाले, 'अरे बाबांनो, तुम्ही जे करताहात, त्याच काय परिणाम होईल. हे लक्षात घ्या. एकदा झाड मोडून खाली पडल्यावर, पुढे जन्मभर आपल्याला जी फळं पाहिजेत, ती कोण देईल, याचा विचार केला का?'

तात्पर्य

- कोणत्याही गोष्टीचा परिणाम काय होईल याचा दूरवर विचार केला पाहिजे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel