मन धरितां करितां अर्जी ।
वरकांती रक्षितां मर्जी ॥धृ०॥
संतोषाचा उदार तुमचा नाहीं घेतला कर जी ।
शोध करूनी पाहील तो शोधिक वरकड मतलबगरजी ॥१॥
नाही गोष्ट एखादी विषादीं पडू न वरचेवर जी ।
विष्कपथ जहराचा पेला पचवून राखा गरजी ॥२॥
स्नेह घडल्यावर प्रीत जडल्यावर ठेवू नको अंतर जी ।
मात करून प्यादा गेल्यावर काय करिल मग फर्जी ? ॥३॥
सगनभाऊ म्हणे विकल्प त्यागुन विठ्ठल ह्रदयीं स्मर जी ।
कवी कान्हु म्हणे पडल्या प्रसंगीं समय प्रति सादरजी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel